रोहित पाटील यांच्या प्रचाराचा ढवळी येथे शुभारंभ…तासगाव कवठेमहांकाळच्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:साधू बुवांचा नाद असणाऱ्या माणसांनी त्यागाची भूमिका ठेवणे गरजेचे आहे,पाच वर्षे भावी आमदार म्हणून पोराला फिरवले व ऐनवेळी तुम्ही उमेदवार झालात जो पोराचा झाला नाही तो जनतेचा कसा होऊ शकतो अशी खरमरीत टीका खासदार विशाल पाटील यांनी संजय काका पाटील यांच्यावर केली.ढवळी येथे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार सुमनताई पाटील,रोहित पाटील यांचे तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले,बाप नसल्याचे दुःख काय असते हे मला माहित आहे, गेले २१ वर्षे मला जाणीवपूर्वक पुढे येऊ दिले नाही.मात्र लोकसभेला जनतेन निवडणूक हातात घेतली मी नेत्यांच्या विश्वासावर राहिलो असतो तर मला कावळा शिवायचा राहिला असता. गेल्या दहा वर्षात तुमच्या खासदाराने तासगाव हा शब्द कधी संसदेत उच्चारला नाही.कालचे भाषण अजित दादांनी कोणासाठी केलं हे मला कळालं नाही.आबा जाऊन नऊ वर्षे झाली मात्र आत्ताच त्यांनी हे का बोलले माणूस गेला की वाद संपतो ही आपली संस्कृती मात्र त्यांच्या मुलाला पाडण्यासाठी कोण उमेदवार मिळेना म्हणून जनतेने लोकसभेला नाकारलेला उमेदवार दिला.यातच त्यांचं अपयश आहे.यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की तासगाव शहरात आसपास तुम्ही फिरला प्रत्येक सातबाऱ्यावर संजय काका यांचा नावाचा उल्लेख आढळतो हे ही गुंडगिरीच आहे मदत करणाऱ्याच्या मूडक्यावर ते पहिल्यांदा पाय ठेवतात याचा अनुभव लवकरच अजित दादांना येईल असे ते म्हणाले.यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले की तासगाव तालुक्याच्या सर्व क्षेत्रात मी काम केले.३५ वर्षे तुम्ही काय केले असा प्रश्न विचारणाऱ्यांनी ३५ वर्षे जनतेने तुम्हाला का नाकारले हा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारावा असे आव्हान दिले.येत्या पाच वर्षात महिला व तरुणींसाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये कोडींग क्लासेस संकल्पना राबवणार आहे. तसेच मुलींच्या आरोग्यासाठी एच पी व्ही ही लस या मतदारसंघातील मुलींना देणार असून ते देणारा हा मतदारसंघ भारतातील एकमेव असेल.पाणी योजनांची थट्टा करणारे पाईपलाईन मध्ये उंदीर खेळतील म्हणणारे आता पाणी पोहोचायच्या आत नारळ घेऊन पाणी पुजायला धावतात.नारळाचे पाणी पुढे गेले, शेतकऱ्याला कमी पण व्हाट्सअप वर पाणी जास्त आले लोकांची थट्टा तुम्ही केली आहे.एमआयडीसीला ही विरोध तुम्हीच केला दहा वर्षे तुम्हाला संधी देऊनही बोलला नाही मात्र मी बोलतो म्हणून लोक मला स्वीकारतात या मतदारसंघाचे राजकारण फक्त विकासावर होईल याची काळजी घ्या असा इशारा त्यांनी दिला.कालच्या सभेत मला बाळ म्हणून संबोधणाऱ्यानी तुमच्या बाळाला का माघार घ्यावी लागली पक्ष नेतृत्वाला उमेदवार का बदलावा लागला हे फक्त सांगावे अशी खोचक टीका केली.हे त्या पाच वर्षात बाजार समितीची इमारत पूर्ण होईल त्या ठिकाणी द्राक्षांची सौदे चालू करणार असून तासगाव येथे पाच कोटींची माती, पाणी व काडी परीक्षण करणारे आधुनिक प्रयोगशाळा उभी राहणार आहे असे त्यांनी सांगितले.यावेळी खा.विशाल दादा पाटील,संजय दादा पाटील,हाय्युम सावनूरकर,विश्वास पाटील,अनिता सगरे,युवराज पाटील, अजय पाटील यांच्या सह इतर मान्यवरांची भाषणे झाली.यावेळी जेष्ठ नेते शंकर दादा पाटील,निवास नाना पाटील,खुजट वकील,कुंभार वकील,सावंत वकील,संजय दादा पाटील,सुरेश भाऊ पाटील,सतिश पवार,रामभाऊ आण्णा थोरात,अमोल नाना शिंदे,संजय दादा पाटील वडगाव ,संदीप पाटील ,अमोल आबा पाटील ,सागर दादा पाटील , जालिंदर बापू देसाई,संजय बापू हजारे, बाळासाहेब पाटील, गणेश पाटील, महेश भाऊ पवार,दादासाहेब ढेरे, टीव्ही आबा पाटील , दत्ताजीराव पाटील, शंतनु भैया सगरे, भगवान आबा वाघमारे, दीपक आबा ओलेकर,दिलीप भाऊ झुरे, कुमार दाजी पाटील, दादासाहेब कोळेकर, तज्जुदिन भैया तांबोळी , खंडू पवार, नलिनीताई पवार, कमल काकी, शुभांगी ताई साळुंखे, पुनम माळी ताई, सुशीला ताई माळी, सत्वशीला पाटील, मायाताई एडके, सुरेखाताई कोळेकर, कुसुमताई कोळेकर, सोनाली पाटील,राजू भाऊ सावंत, रवी भाऊ पाटील, एडके नाना, डी के पाटील, विलास बापू पाटील, गजानन बापू शेंडगे, भीमराव आप्पा दौंड, सिराज भैय्या,यांच्या सह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.