प्रतिष्ठा न्यूज

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी मुफ्ती कुटुंबियांना कधी लाज वाटली का? – हिंदु जनजागृती समिती

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार झालाहिंदूंचा जो वंशविच्छेद झालाहिंदू महिलांवर जे अत्याचार झालेलहान बालकांच्या हत्या झाल्यात्याविषयी कधी इल्तिजा मुफ्ती यांना लाज वाटली का गेली अनेक वर्षे काश्मीरातील लाल चौकात दिवसाढवळ्या भारताचा राष्ट्रध्वज जाळला जात होतात्या वेळी कधी मुफ्ती कुटुंबियांची मान शरमेने खाली गेली का ते आज श्रीरामाला लाज वाटली पाहिजे म्हणत आहेतभगवान श्रीरामाचा अवमान करणार्‍या हिंदुद्रोही इल्तिजा मुफ्ती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावीअशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे यांनी केली आहे.

      नुकतेच काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपीप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी ‘एक्स’वर एक आक्षेपार्ह पोस्ट केलीया पोस्टमध्ये त्यांनी ‘हिंदुत्व हा एक आजार आहेज्याने कोट्यवधी भारतियांना ग्रासले आहे आणि देवाचे नाव कलंकित केले आहेप्रभु राम यांना लाज वाटली पाहिजे’असे लिहले आहेएक कथित व्हीडीओ जो कोणत्या ठिकाणचा आहेकेव्हाचा आहेयाची काही माहिती न देता त्यावरून थेट हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभु श्रीराम यांच्याविषयी आणि हिंदु धर्माविषयी वक्तव्य करून इल्तिजा यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

      अशा प्रकारचे वक्तव्य जर एखाद्या हिंदूने केले असतेतर  लगेच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा दिल्या गेल्या असत्यात्यांच्यावर लगेच कारवाई झाली असतीमेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात बी.केगंजू यांना एका कन्टेनरमध्ये डांबून त्यांची हत्या करण्यात आलीयानंतर त्यांच्या पत्नीला त्यांच्यासमोर त्यांच्या लहान मुलाला ठार मारून त्याचा रक्तमिश्रीत भात खायला लावलायाविषयी कधी मुफ्ती परिवाराला लाज वाटली नाहीअसेही समितीने म्हटले आहे.