प्रतिष्ठा न्यूज

संस्कार भारती सांगली जिल्हा समितीचा परिवार मेळावा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संस्कार भारती सांगली जिल्हा समितीचा परिवार मेळावा नुकताच संपन्न झाला. श्री.विसुभाऊ बापट यांचा काव्य सादरीकरणाचा ‘कुटुंब रंगलय काव्यात’ हा कार्यक्रम आणि श्री.श्रीरंग जोशी यांच्या गायनाची बहारदार मैफल यात श्रोतृवृंद रंगून गेला.
सौ.अनघा कुलकर्णी यांनी रेखाटलेल्या रंगावलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात उर्वी मराठे हिने गायिलेल्या संस्कार भारती गीताने झाली. श्री.विसुभाऊ बापट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.संस्थेचे अध्यक्ष श्री.माधव वैशंपायन यांनी प्रास्ताविक केले.पाहुण्यांचा परिचय श्री.सुहास पंडित यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात
श्री बापट यांनी मराठी भाषेची समृद्धता, भारतीय मूल्ये आणि परंपरा तसेच कुटुंब व्यवस्था व अन्य अनेक विषयांवरील कविता खुमासदार पद्धतीने साभिनय कविता सादर करून श्रोत्यांची उत्स्फुर्त दाद मिळवली. त्यांना श्री.प्रकाश बापट यांनी तबल्याची साथ दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्रीरंग जोशी यांनी नाट्यगीते,भक्तीगीते व भावगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.श्री.भास्कर पेठे,परेश पेठे व सुमीत जमदाडे यांच्या साथसंगतीने श्रोत्यांना तृप्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.व्यंकटेश जंबगी यांनी केले.
श्री.विवेक गाडगीळ यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास संस्कार भारती पश्चिम प्रांत प्रतिनिधी श्री.विसुभाऊ कुलकर्णी, अमित मराठे व मिलिंद महाबळ,भालचंद्र चितळे संतोष बापट गुरू खिलारे परागेश जोशी, सागर सगरे आणि अन्य पदाधिकारी,सभासद व परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.