प्रतिष्ठा न्यूज

सावळज सहित परिसराला मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपले,रब्बी पिकांना फायदा मात्र द्राक्ष बागांना फटका

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज प्रतिनिधी : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सावळज व परिसराला अवकाळी पावसाने झोडपले या अचानक आलेल्या पावसामुळे फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागा संकटात सापडला आहेत या द्राक्ष बागांवरती गळ, कुज, करपा, बॅक्टेरिया भुरी व डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे यामुळे या अस्मानी संकटातून द्राक्ष शेती कशी वाचायची हा मोठा यक्ष प्रश्न द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसमोर उभा आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेली पीके उध्वस्त होण्याची भीती बळीराजाला आहे. ऐन द्राक्ष पीक छाटणी हंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा विवंचनेत सापडला आहे.
काही अंशी या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी द्राक्ष बागांना मात्र याचा मोठा फटका बसणार आहे त्यामुळे येथील शेतकरी चिंताक्रांत बनला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.