प्रतिष्ठा न्यूज

जाधव कुटुंबियांना उघड्यावर पडू देणार नाही त्यांची पूर्ण काळजी मराठा समाज घेईल- मनोज पाटील जरांगे

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : कंधार तालुक्यातील चोंडी येथील सकल मराठा बांधव बालाजी पाटील जाधव यांचे दि.8 डिसेंबर रोजी कंधार येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण सभेचा संकलित निधी देण्यासाठी जात असताना दि.7 डिसेंबर रोजी अपघाती दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी मराठा संघर्ष योद्धे मनोज पाटील जरांगे यांनी जाधव कुटुंबीयांची चोंडी येथे जाऊन भेट घेतली.
जाधव कुटुंबीयांना या दुखःतुन सावरण्याचे बळ मिळो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करून समाजाप्रती असलेली तळमळ मनोज पाटील यांनी दाखवून दिली. कै. बालाजी पाटील जाधव यांच्या कुटुंबियांना मी व माझा मराठा समाज उघड्यावर पडू देणार नाही. त्यांच्या कुटुंबियांनाची पूर्ण काळजी समाज घेईल. मी या घटनेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविले आहे असे सांगून कंधार व लोहा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी यांच्या कुटुंबियांची काळजी घेऊन त्यांना धीर देत जावा असे मनोज पाटील जरांगे यांनी उपस्थितांना सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.