प्रतिष्ठा न्यूज

राजीव गांधी यांनी २१ व्या शतकात जागतिक शक्ती म्हणून उदयास येण्याची पायरी सेट केली – प्रा.सतीश देसाई

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : राजीव गांधी (२० ऑगस्ट १९४४-२१ मे १९९१), वयाच्या ४० व्या वर्षी भारताचे सर्वात रुण पंtत तप्रधान, एका अशांत तरीही परिवर्तनशील युगात राष्ट्राचे नेतृत्व केले ज्याने २१ व्या शतकात जागतिक शक्ती म्हणून दयास येण्याची पायरी सेट केली.
त्यांचा कार्यकाळ, जरी दुःखदपणे कमी झाला, तरी दूरदर्शी सुधारणांनी चिन्हांकित केले ज्याने भारताचे सामाजिक-आर्थिक परिदृश्य मूलभूतपणे बदलले.
त्यांच्या योगदानाचा विचार करताच हे स्पष्ट होते की राजीव गांधींचा वारसा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि आधुनिक, प्रगतीशील भारताप्रती बांधिलकीचा पुरावा आहे.
“राजीव गांधी यांच्या विचार आणि कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा तसेच देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवून राष्ट्र उभारणीच्या कामात झोकून द्यावे ” असे मत आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई यांनी अध्यक्षस्थानावर बोलताना व्यक्त केले. ते गगनबावडा येथील आनंदी महाविद्यालयात आयोजित स्व. राजीव गांधी यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त बोलत होते. संस्था सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, आधुनिक पुरोगामी विचारांच्या माध्यमातून देशाला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी राजीव गांधींनी अथक प्रयत्न केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील म्हणाले की, “नवा भारत घडविण्यासाठी माहिती, तंत्रज्ञान आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून राजीव गांधी यांनी आधुनिक भारताचे स्वप्न साकारले आणि १८ वर्षांवरील युवकांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, या बळावर आजची तरुण पिढी सक्रिय होत आहे”. या कार्यक्रमास विशाल देसाई, औदुंबर जाधव, डॉ. संतोष भोसले, प्रा. राहुल कांबळे आदी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एस. पानारी तर आभार प्रा. आदिनाथ कांबळे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.