*तासगाव महादौडीत हिंदू एकतेचे विराट दर्शन..* दौडला युवानेते प्रभाकर पाटील,संतोष देसाई यांची प्रमुख उपस्थिती…
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :देव,देश,धर्म रक्षणासाठी गेली नऊ दिवस सुरु असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या श्री दुर्गामाता दौडीची आज हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत महादौडीने सांगता झाली.या दौडीत आज विराट हिंदू ऐकतेचे दर्शन तासगाव कराना पहायला मिळाले.या दुर्गामाता महा दौडीचे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळी शिवतीर्थावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून आरती होऊन ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र झाल्यानंतर या महादौडीस प्रारंभ झाला.पारंपारिक वाद्यांच्या गजरात भगवा ध्वज घेऊन हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत निघालेल्या दौडीचे पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी काढून स्वागत करून महिलांनी भगव्या ध्वजाचे पूजन करून पंचारतीने औक्षण केले.आजच्या या महादौडीत लहान मुले,तरुण,जेष्ठ धारकरी,तरुणीसह,महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय,जय श्रीराम,भारत माता की जय,अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी प्रत्येक धारकरी डोक्यावर भगवा फेटा,भगवी पांढरी टोपी आणि कपाळी भगवा टिळा लावून सहभागी झाला होता.यावेळी भाजप युवानेते प्रभाकर पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री.संतोष देसाई उपस्थित होते.
यावेळी श्री शिवतीर्थ महाराजांच्या मूर्तीच्या चबुतऱ्याच्या बाजूचा रोड दोन्ही बाजूने खराब होता,खड्डे पडले होते,त्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकऱ्यांनी निवेदन दिले होते.भाजपा युवा नेते प्रभाकर पाटील यांनी रस्ता दोन्ही बाजूने काँक्रिटचा करण्याचे आश्वासन दिले होते,आज दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या कामाचा भूमिपूजन सोहळा जेष्ठ धारकऱ्यांच्या हस्ते पार पडला.त्याच बरोबर महाराजांची नित्य पूजा ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांच्या वतीने होते,मूर्तीसाठी लागणारे हार हे स्वतःची पदर मोड करून ते धारकरी करतात,ही गोष्ट लक्षात आल्यावर इथून पुढे त्या हाराचा खर्च नगर पालिकेने उचलावा यासाठी प्रभाकर पाटील यांनी मा.मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या.यावेळी प्रमुख पाहुणे देसाई यांनी लव्ह जिहाद,लँड जिहाद,याबाबत हिंदू समाजाने जागृत राहून,इथून पुढच्या काळात आपल्या माता भगिनींचे संरक्षण करण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले.सिद्धेश्वर लांब,ऋषिकेश पेटकर,आनंदराव धनवडे,रणजित शेटे,सुमित गायकवाड,आणि धारकऱ्यांनी संपूर्ण 9 दिवसाच्या दौडीचे नियोजन केले होते.