प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुसार नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ पीक विमा मंजूर- जिल्हाधिकारी राऊत यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर व खरीब ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केली. या अधिसुचनेद्वारे सर्व महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात 25 टक्के रक्कम आगाऊ देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज दि 20 ऑक्टोबर 2022 रोजी पिकांसाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार सोयाबीन, कापुस, तूर, व ज्वारी या पिकांसाठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यास जवळपास 400 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.