प्रतिष्ठा न्यूज

हरिपूर कोथळी नवीन पुलास छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे नाव द्या : स्वराज्य पक्षाची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नुकताच पूर्ण झालेला वाहतुकीस तयार असणारा सांगली कोल्हापूर जिल्ह्याना जोडणारा कृष्णा नदीवरील हरिपूर तें कोथळी या नवीन पुलास छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आज स्वराज्य पक्षाने केली आहे.याबाबतचें निवेदन आज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाराला चालना मिळण्यासाठी व्यापार उद्योग वाढण्या साठी त्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी जयसिंगपूर येथे व्यापारी वसाहत निर्माण केली.त्याचा फायदा सांगलीतील व्यापारावर झाला.सांगली जिल्हा हळद उत्पादन साठी प्रसिद्ध असून त्या काळात हळदीची गोदामे सांगलीत मोठ्या प्रमाणात होती.त्या काळात छत्रपतीनी दाखवलेली दूरदृष्टी लक्षात घेऊन त्यांचा उचित सन्मान होण्याच्या दृष्टीने पुलास छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केल्यास तो उचित ठरेल असे यावेळी दिलेल्या निवेदनातुन मागणी करण्यात आली आहे. यावेळी स्वराज्यचें सांगली जिल्हा अध्यक्ष दीपक मुळीक,संपर्क प्रमुख सुशांत पाटील, उपाध्यक्ष अमोल कदम,संघटक सुनील बापट अभिजित कदम,बापुसो क्षीरसागर,अमित थोटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.