पुनर्वसन हद्दीतील वहीवाटीचा रस्ता बंद केल्यास निमणी नेहरूनगर मधील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निमणी नेहरू नगर येथील फॉरेस्टचीं जमीन पुनर्वसनात वर्ग केली आहे. त्यामध्ये सुमारे 80 वर्षा पासून वहिवाटीचे रस्ते असून, पुनर्वसनात हा रस्ता बंद झाल्यास तिथून ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना शेत मजुरांना अडचण होणार असल्याने शेतकऱ्यांचें मोठे नुकसान होणार आहे.किमान 300 तें 350 एकर शेतजमीन या रस्त्याच्या वहीवाटीवर अवलंबून असून, इतर कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही.याआधी गावातील शेतकरी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव करून याबाबत वेळोवेळी प्रशासनास निवेदन दिली आहेत.परंतु त्यावर कोणतीही झाली नसल्याने आज निमणी नेहरू नगरच्या ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन योग्य मार्ग काढून शेतकऱ्यांचें होणारे नुकसान टाळावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.