प्रतिष्ठा न्यूज

कापशी मंडळातील सोयाबीन पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची : शेतकऱ्यांची मागणी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील कापशी मंडळातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर यावर्षी “यलो मोज्याक” या रोगामुळे पिकाचे 70 ते 80 टक्के नुकसान झाले असून, पूर्वीच संकटात असलेल्या शेतकऱ्याचे  सोयाबीन वरील रोगामुळे मोठे आर्थिक नुकसान होणारे आहे. या वर्षीच्या जुलै, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकांचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले असतांनाही तालुक्यातील प्रशासनाने शून्य नुकसान झाल्याचा आवाहल दिला.त्यातच तालुक्यातील लोकप्रतिनिधीने म्हणावे तसे लक्ष दिले नाही. या वर्षातील अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना पिकांचे व शेतीचे अनुदान प्राप्त झाले परंतु या लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानातून जाणीवपूर्वक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दूर ठेवले आहे. त्यात आता हा सोयाबीन पिकावर आलेला “येलो मोज्याक” व कापसवरील लाल्या रोग मोठया प्रमाणावर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अधिकच चिंता वाढली आहे. तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा सोयाबीन पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची गरज आहे.
या बाबतीत लोहा व कंधार तालुक्यातील तहसीलदार व कृषी अधिकारी यांना या विषयी गांभीर्य नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. तेव्हा तालुका प्रशासनाने सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी चे निवेदन मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर मारतळा येथील शेतकरी प्रदीप पाटील ढेपे, ज्ञानेश्वर पाटील उबाळे, अच्युतराव ढेपे, संतोष पाटील भरकडे यांच्या सह्या आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.