प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

पाणी प्रश्नासाठी खासदारकी पणाला लावणाऱ्या संजयकाका पाटील यांना मते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा : सौ. ज्योतीताई पाटील; सांगली महापालिका क्षेत्रात प्रचार बैठका

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्याचा पाणी प्रश्नासाठी आपली खासदारकी पणाला लावणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांना मते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ महापालिका क्षेत्रात कुपवाड, मिरज, सांगली येथील विविध प्रभागात ज्योतीताई पाटील यांच्या प्रचार बैठका झाल्या. यावेळी बोलताना ज्योतीताई म्हणाल्या, संजयकाका पाटील यांनी जिल्हाभर केलेली विकास कामे आणि जनतेचे प्रेम यावरती ते पुन्हा एकदा निवडून येणार आहेत. त्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे. शेतकरी सुखी व्हावा आणि जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात पाणी गेले पाहिजे यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. सांगली जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटावा आणि सांगली जिल्हा हरितक्रांतीने नटावा यासाठी कष्ट घेतले आहेत. सांगली जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटावा. सांगली जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा. या जिल्ह्यातला शेतकरी आणि सामान्यतः सामान्य नागरिक हा सुखी आणि संपन्न जीवन जगावा. असे वाटत असेल तर संजयकाका पाटील यांना मते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावीत असे आवाहन ज्योतीताई पाटील यांनी केले.
भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील,आयेशा शेख, रूपाली अडसुळे, संयोगिता चव्हाण, जयश्री सावंत, मीना कोळी, मीनाक्षी माने, मयुरा ढगे, जयश्री यादव, वर्षा सरगर, संगीता जाधव,सविता हुजरे, प्रणाली जाधव, राजश्री तांबेकर,नीलिमा पाटील उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.