बुधगाव येथील शेतकऱ्यांचा संजयकाकांना मताधिक्य देण्याचा निर्धार ; किसान मोर्चाचा मेळावा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोदी सरकारने दिलासा दिला आहे. म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी संजयकाकांना मताधिक्य देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
बुधगाव येथे भाजप किसान मोर्चा सांगली जिल्हा शहरचे वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शेतकरी मेळावा आयोजित करणेत आला. या मेळाव्यात मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी यशस्वीपणे राबविलेल्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे हित झाले. शेतकऱ्यांना मानधन या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. आणि संजयकाकांना निवडून देण्याचा निर्धार केला.
यावेळी गणेशतात्या भेगडे प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा, पृथ्वीराजभैय्या पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा, रंगनाथ सोलंके महामंत्री किसान मोर्चा, मनोज कासवा सरचिटणीस, दिनकर काटे सरचिटणीस, अभिषेक प्रभुदेसाई सरचिटणीस, सर्व प्रदेशचे तसेच बाळासाहेब पाटील ऊपाध्यक्ष सांगली जिल्हा, विक्रमभाऊ पाटील पं. स. माजी उपसभापती, अविनाश शिंदे उपसरपंच, धनाजी पाटील ग्रा.पं.सदस्य, मनोहर पाटील ग्रा.पं.सदस्य सौ.वैशाली पाटील सरपंच, सौ.जयश्री पाटील सदस्या, सौ.शुभांगी कोळी सदस्या ग्रा.पं. सौ.स्नेहल व्हणुंंनुंरे मंडल अध्यक्षा, विनायकराव शिंदे नेते भाजपा, डाॅ.सयाजी कदम अध्यक्ष भाजपा सतीश म्हस्के समन्वयक किसान मोर्चा, प्रदीप कार्वेकर सरचिटणीस किसान मोर्चा, संभाजी पाटील भाजपा नेते व पदाधिकारी किसान मोर्चा तसेच संख्येने शेतकरी हजर होते.
या कार्यक्रमाचे नियोजन जयवतंराव पाटील अध्यक्ष किसान मोर्चा सांगली जिल्हा (शहर) यांनी केले.