प्रतिष्ठा न्यूज

पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करावी – मनोज भिसे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून तापमान ही वाढत आहे .यामुळे पाण्याची पातळी खाली जाऊन ,पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून,पशुधन धोक्यात आले आहे.तालुक्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जत तालुक्यातील 35 तलावात ठणठणाट निर्माण झाला आहे.सर्वात मोठा असलेला संख तलाव कोरडा पडलाय.तालुक्यातील अनेक गावात 96 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे .
दरम्यान जत तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी अनेक दिवसांपासून होत असून,याबाबतीत योग्य तो ठोस निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी जत तालुक्याचा ताबडतोब दौरा करून परिस्थितीची पाहणी करावी आणि योग्य तो निर्णय घेऊन जत तालुक्यातील जनतेला दिलासा व जनावरांना जीवनदान द्यावे.अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.