प्रतिष्ठा न्यूज

मानवी जीवनाच्या संरक्षणासाठी आयुर्विम्याची आवश्यकता -संतोष कांबळे

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : ‘मानवी जीवनाचे रक्षण आणि पैशाच्या बचतीसाठी आयुर्विम्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे’असे मत आयुर्विमा विकास अधिकारी संतोष कांबळे यांनी व्यक्त केले. ते पद्मश्री ग .गो.जाधव महाविद्यालय गगनबावडा वाणिज्य  विभागाच्या वतीने घेतलेल्या ‘आयुर्विमा काळाची गरज ‘ या विषयांतर्गत बोलत होते. अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.टी. एम.पाटील म्हणाले की, “अलीकडच्या वेगवान युगात मानवी जीवन धकाधकीचे बनले आहे त्यामुळे पिकविमा ,अग्निविमा याबरोबरच प्रत्येक व्यक्तीने आयुर्विम्याचे संरक्षण घेतले पाहिजे. यामुळे कुटुंब आर्थिक स्वंरक्षित होते.”
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपप्राचार्य डॉ.एस. एस. पानारी व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य एच.एस. फरास यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्तविक डॉ.संदीप पानारी , आभार प्रा.रिया पाटिल यांनी मांडले. सूत्रसंचालन ए .एस.कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय सेवक तसेच वाणिज्य विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.