कुंडल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रणसंग्रामच्या उमेदवारांनी स्टॅम्पवर लिहून दिला जाहिरनामा ; ॲड. दिपक लाड बनले चर्चेचा विषय ; महाराष्ट्रातले पहिलेच उदाहरण
प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील क्रांतीनगरी कुंडल ग्रामपंचायत निवडणुकीत ॲड. दिपक लाड यांच्या रणसंग्राम पॅनेलच्या उमेदवारांनी चक्क स्टॅम्प पेपरवर जाहिरनामा लिहून दिला आहे. महाराष्ट्रातील हे पहिलेच उदाहरण असल्याने कुंडल परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष अँड दिपक लाड यांची या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी आहे.
कोणतेही पद सत्ता संपत्ती नसताना आजवर केलेला कार्याचा आलेख तुमच्यासमोर आहे स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांनी प्रेरित होऊन कुंडल गावचे नाव रोशन होण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी रणसंग्रामच्या माध्यमातून केलेल्या कार्याच्या जोरावर जनतेचा रणसंग्राम हे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राहिलेले उभा केले असल्याचे लाड यांनी सांगितले. पॅनल मधील सर्व उमेदवार नेत्यांनी नाही तर जनतेने दिलेले गोरगरीबारातील आहेत.