प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे मुख्याधिकारी पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने धरण क्षेत्रात व नदी भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस असल्याने गाळमिश्रित व गढूळ पाणी येत आहे.भिलवडी जॅकवेल येथून उपसा करण्यात येणारे पाणी नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र येथून स्वच्छ व निर्जंतुक करून संपूर्ण तासगाव शहरात पाणीपुरवठा केला जातो परंतु तरीही पावसाळ्यामध्ये गाळ मिश्रित व गढूळ पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शहरातील व वासुंबे हद्दीतील सर्व नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.