प्रतिष्ठा न्यूज

पुल, बंधारे, रस्ते पाण्याखाली गेलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सध्या सांगली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे व चांदोली व कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरीता होत असलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यातील कृष्णा, वारणा व येरळा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पाण्यामुळे नदीवरील वाहतुकीस असलेले पुल, बंधारे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरून कोणी प्रवासकरून कोणत्याही जीवीतास धोका पोहचू नये याकरीता सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये वाहतूक मार्गात दि. 28 जुलै 2024 रोजीचे 00.01 ते दि. 6 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे बदल केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 131 प्रमाणे शिक्षा किंवा दंड करण्यात येईल, असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जारी केले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.