प्रतिष्ठा न्यूज

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज ; सांगलीत पूरस्थितीच्या आढावा घेणारी बैठक; पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२७: सांगली शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागामधील नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करावी करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच जिल्हा प्रशासन, तसेच महापालिका तसेच ग्रामपंचायत प्रशासनामार्फत असलेल्या पूरग्रस्तांच्या स्थलांतर आणि मदतीच्या कार्याला गती द्यावी असा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीत शनिवारी सायंकाळी घेण्यात आला. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीस माजी खासदार संजयकाका पाटील आमदार सुधीर दादा गाडगीळ पक्षाचे विधानसभा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक शेखर इनामदार, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार गाडगीळ यांनी तातडीने निमंत्रित केलेल्या या बैठकीत सांगली विधानसभा क्षेत्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीबाबत पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंदभाऊ देशपांडे ,पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्तीव्यवस्थापन बैठक पार पडली.
उद्भवलेल्या पूरस्थितीमध्ये स्थलांतरित पूरग्रस्तांची राहण्याची, जेवणाची, औषध उपचारांची काटेकोर देखरेखीमधे व्यवस्था करावी. जिथे प्रशासनाची मदत पोचणार नाही तिथे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोचून प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचण्यासाठी तत्परतेने कार्यक्षम राहावे असे आवाहन आमदार गाडगीळ यांनी केले.
या बैठकीत माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव अश्रफ वांकर, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य धीरज सूर्यवंशी, जिल्हा प्रवक्ता मुन्नाभाई कुरणे , जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग , महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, प्रकाशतात्या बिरजे,विश्वजीत पाटील, दीपक माने, माजी नगरसेवक युवराज बावडेकर ,अविनाश मोहिते,श्रीकांततात्या शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, राज्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन पूर परिस्थितीवर नियंत्रण करायचा तसेच पूरग्रस्तांना मदत करायचा प्रयत्न करत आहे. परंतु भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही या मदत कार्यात पुढाकार घेतला पाहिजे. संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेऊन पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.पूरग्रस्तांच्या मदतीत कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे आपण सर्वांनीच काटेकोर लक्ष दिले पाहिजे. आम्ही सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आहोत त्यामुळे शासनाकडूनही सातत्याने मदतीचा हात पुढे असणार आहे असेही आमदार गाडगीळ म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.