प्रतिष्ठा न्यूज

आर.आर.आबा असते तर त्यांनी आरोपीना पाठीशी घातलंच नसतं : मुख्य आरोपीना अटक झाल्याशिवाय कै. अनिल जाधव यांच्या अस्थी विसर्जन करणार नाही; कुटुंबियांची भूमिका

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव येथील कै.अनिल जाधव यांच्या खून प्रकरनातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. त्याला वाचवण्याची भूमिका पोलीस प्रशासन आणि राजकीय पक्ष घेत आहेत. पोलिस राजकीय दबावा खाली कामं करत आहेत. अशा प्रकारे खुनातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर अशा सर्वांचा शिवनेरी मंडळ निषेध करून येत्या चार दिवसात मुख्य आरोपीला अटक करावी अन्यथा पोलीस स्टेशनं वर मशाल मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवनेरी च्या प्रमुख पदाधिकारी आणि जाधव यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

यावेळी बोलताना नेते संदीप गिड्डे म्हणाले की आज आर आर आबा असते तर पक्ष आणि पदाधिकारी याचा विचार न करता त्यांनी आरोपीना पोलीसांच्या ताब्यात दिले असते,आबांच्या विचारांचा वारसा जपण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेत्यांनी आरोपीना पाठीशी न घालता हजर करावे.तसेच शिवनेरी मंडळ हे सामाजिक कार्य करणारे मंडळ आहे,मंडळात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे जाधव कुटुंबाला न्याय मिळावा अशी भूमिका मंडळाची आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.येथील शिवनेरी कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांचा 4 ऑगस्ट रोजी निर्घृण खून करण्यात आला.यातील प्रमुख आरोपीना अद्याप अटक झालेली नाही.त्यामुळे जाधव कुटुंबीय संतप्त झाले आहेत.अनिल जाधव यांचा मुलगा आशिष,आदित्य आणि शिवनेरी मंडळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला.यावेळी बोलताना पोलिसांवर दबाव आहे,आणि खून होऊन एक महिना उलटला आहे तरीही प्रमुख आरोपी मोकाट आहेत,राजकीय वरद हस्तानेच आरोपीना अटक होत नाही,तसेच मुख्य आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत कै.अनिल जाधव यांच्या अस्थी विसर्जन करणार नाही अस जाधव कुटुंबीय आणि मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.तसेच मुख्य आरोपीना अटक पूर्व जामीन मिळू नये यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहे,अशी माहिती गिड्डे यांनी यावेळी दिली.यावेळी संदीप गिड्डे,संदीप सावंत, शीतल पाटील, विशाल भोसले यांच्यासह शिवनेरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.