प्रतिष्ठा न्यूज

पाण्याचे राजकारण करणाऱ्यांचा इतिहास बाहेर काढल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही : रोहित पाटील; सुमनताईंचे उपोषण सुरू

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दुष्काळी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १९ गावातील शेतक-यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे,यासाठी आमदार सुमनताई पाटील आणि मुलगा रोहित हे आज पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भागातील सर्व शेतक-यांना सोबत घेऊन आमरण उपोषणाला बसले आहेत. पाण्याचे राजकारण करणाऱ्यांचा इतिहास बाहेर काढू असा इशारा देत पाण्याचे राजकारण करण्याची आमची भूमिका नाही, असे वक्तव्य रोहित पाटील यांनी केले.उपोषणाच्या इशा-यानंतर सुट्टी दिवशीही शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी.पाणी उपलब्ध करुन देण्यास महाराष्ट्र शासनाने रविवारी अंतिम मंजूरी दिली आहे.याबाबतचे पत्र महाराष्ट्र शासनाचें उप सचिव यांनी रविवारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले आहे.टेंभू योजनेसाठी मंजूर असलेल्या २२ टी. एम.सी.पाण्याचे वाटपाचे नियोजन पूर्ण झाल्यामुळे आणखी नविन गावे आणि क्षेत्र वाढविण्यासाठी पाण्याची उपलब्धता नव्हती त्यामुळे गेल्या ३० वर्षामध्ये माजी गृहमंत्री आर.आर. पाटील,आमदार अनिल बाबर, खासदार संजय पाटील,आमदार सुमन आर आर पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज आणि ताकदवान लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाठपुरावा करुनही या १९ गावांचा समावेश होऊ शकला नव्हता.महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील जलसंपदामंत्री असताना राज्य शासनाने पत्र जा. क्र. २०२१(२१६/२०२१) दि २९/०४/२०२२ नुसार ८ टी. एम. सी. अतिरिक्त पाणी टेंभू उपलब्ध करुन दिलेले आहे.परंतू ही तत्वत: मंजूरी होती तोपर्यंत विस्तारीत टेंभू उपसा सिंचन योजनेचा तृतीय प्रशासकीय मान्यतेसाठी अहवाल महाराष्ट्र शासनास ८ मे २०२३ रोजी मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.आठ टी. एम. सी. पाण्यासाठी अंतिम मंजूरी मिळावी आणि उपलब्धता झालेनंतर या १९ गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी तृतीय सु.प्र.मा.मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आमदार सुमन पाटील आणि सुपुत्र रोहित हें जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलताना रोहित पाटील यांनी सु.प्र.मा.मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे सांगितले,आमच्या मागण्यापैकी पहिली मागणी मान्य झाली आहे, ताईच्या मागणीनुसार पाणी देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे,त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत,जर कुणाला वाटत असेल ताईंनी काय प्रयत्न केले तर त्यांनी व्यासपीठावर यावं आणि पुरावे घेऊन जावेत,पाण्याच राजकारण आम्ही करणार नाही,असा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे,आम्ही कुणावर आरोप करणार नाही,पन ज्या दिवशी सू.प्र.मा मंजूर होईल त्या दिवशी निश्चित पणाने असा तुमचा इतिहास काढू की जो इतिहास तुम्ही आबांचा काढणार होता,त्याच्या पेक्षा तुमचा इतिहास काढल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा रोहित पाटील यांनी कुणाचेहि नाव न घेता दिला.पाण्यासाठीची हि अखेरचीं लढाई आहे,त्यानंतर आमचं जे काय व्हायचं तें होउदे आम्ही त्यासाठी तयार आहोत,हि भूमिका आम्ही स्वीकारली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
टेंभू विस्तारीतच्या अहवालास तृतीय सुधारीत मान्यता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढा सुरु राहणार असल्याचेहि यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचें विशाल पाटील यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला,यावेळी बोलताना त्यांनी पाण्यावर राजकारण या तालुक्यात जिल्ह्यात कधीही झालं नाही,तसेच तुमच कर्तृत्व काय,तुमच्या पोराच कर्तृत्व काय,पोराला घेऊन प्रेस घेता,नाही त्याच्या वर बोलता,तुमची ओळख काय आहे हें सगळ्यांनी ओळखलं आहे,आयत्या बिळावर नागोबा झालेल तुम्ही,अशी खरमरीत टीका कुणाच नाव न घेता यावेळी त्यांनी केली.

भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.