मारतळा येथे “भारत जोडो” यात्रा संदर्भात मा.अशोकराव चव्हाण यांचे मार्गदर्शना खाली आढावा बैठक संपन्न
प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा. खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या कन्याकुमारी ते काश्मीर “भारत जोडो” यात्रा दि 7 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही यात्रा आपल्या जिल्ह्याच्या देगलूर तालुक्या पासून सुरू होऊन, शंकरनगर, नायगाव, कृष्णूर, उमरा फाटा,कापसी गुंफा, मारतळा, जवाहर नगर, नांदेड येथून जाणार आहे. तरी जिल्ह्याचे लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली “भारत जोडो” यात्रेत सहभागी व्हावे, यासाठी लोहा तालुक्यातील मारतळा येथील कौडगावकर मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली.
यावेळी लोहा, कंधार, व उमरी, धर्माबाद, तालुक्याचा आढावा घेऊन कार्यकत्यांना बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला आमदार अमर राजूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, अनिल मोरे, स्वप्नील लुगारे, लोहा तालुकाध्यक्ष रंगनाथ गुरूजी भुजबळ, कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, उद्योजक मारुती कवळे गुरुजी, सोनू संगेवार, पंचशील कांबळे, भास्कर जोमेगावकर, निरंजन कौडगावकर, उत्तम वडवळे, नागोराव आलेगावकर, किशनराव लोंढे, बालाजी कपाळे, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.