तासगावात एम एम ग्रुपचा वर्धापनदिन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा
समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडू. खा.संजयकाका पाटील
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : रामोशी समाजाच्या मागण्या शासनदरबारी मांडून त्याची सोडवणूक करू असे मत खा.संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले,तासगावात एम एम ग्रुपच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानूगडे पाटील,सम्राट महाडीक,शरद लाड,ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन मदने,राज्य सरचिटणीस विमीत शिरतोडे,नगरसेविका रोहिणी शिरतोडे यांसह या कार्यक्रमास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार पाटील म्हणाले आमचा पक्ष मोठा आहे, आम्ही आपल्या भूमिका पक्ष नेतृत्व व शासन दरबारी मांडू चांगले समाज कार्य आपल्या हातून घडते आहे.एम एम नानां निधड्या छातीचा कार्यकर्ता आहे,माझ्या राजकीय कारकीर्दीस त्यांनी कायम सहकार्य केले आहे. आपणाला राजकीय शक्ती मिळावी यासाठी आम्ही शक्य तितके प्रयत्न करू,स्पर्धा तयार झाल्याशिवाय माणसांना न्याय मिळतं नाही.आणि विकास गतिमान करायचं असल्यास ही स्पर्धा निश्चितपणे असली पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष मोहन नाना मदने म्हणाले की
आपली काय अपेक्षा नाही की कुठल्या तरी पक्षात जाऊन काम करावं पण कुठल्या तरी पक्षाचे पाठबळ असल्याशिवाय समाजकार्य करता येत नाही.गेल्या दहा वर्षात कुठल्याही राजकीय पक्षाने मदत केली नाही,आर्थिक मदत आपल्याला तेवढी नाही आपला समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी आपण प्रयत्न करतोय.आपल्या समाजाला चांगलं शिक्षण घेता यावे,आपणाला कुणाच्यातरी बांदाला जाऊन काम करावे लागते आहे,आपणाला व्यवसायाचे कुठलेच काम नाही पण येणाऱ्या काळात आपलं मोठं सघटन झाले तर शासनाला सुध्दा आपला विचार करावा लागेल.
फडणवीस यांनी आपल्या समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक महामंडळाची घोषणा केली.ते मंडळ झाले तर आपल्या समाजाला चांगला न्याय मिळेल,आता सरकार राहतं की जातंय अशी परिस्थिती आहे.इथ रोज एक नेता पक्ष बदलत आहे.आपण मग कुठल्या पक्षात जायचं मी तालुक्याचे नाही पण गावचे राजकारण करत होतो.आम्ही अजून विचार केला नाही.वेळ हातातून गेली की मग काय करणार.युवा नेते सम्राट बाबा आपणाला विनंती आहे की अजून आम्ही तसा विचार केला नाही. मला राजकीय इच्छा नाही पण समाजाला न्याय मिळावा.मला वाटतं नाही की मी कुठला पक्ष धरला तर समाज माझ्या पाठीशी उभा राहिला. मी राजकारणाचे या स्टेजवरून सांगत नाही.इथून पुढेही आपण समाजासाठ झटू.यावेळी,एम एम ग्रुप चे प्रदेशाध्यक्ष धनाजी जाधव,सांगली जिल्हाध्यक्ष सतीश यलमार,नंदू मंडले आदी कार्यकर्ते आणि हजारो समाज बांधव यावेळी उपस्थित होते.