लिंब येथे जय हनुमान पॅनलचा जल्लोष : भाजप चार, राष्ट्रवादी तीन, सरपंचपद भाजपकडे
प्रतिष्ठा न्यूज
निंबळक प्रतिनिधी : लिंब ता. तासगाव येथील झालेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे चार आणि लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार अविनाश सागरे निवडून आल्याने गावातील ग्रामस्थांनी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
लिंब ग्रामपंचायतमध्ये भाजप पुरस्कृत खासदार संजय काका पाटील व आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्रामविकास पॅनल व आमदार सुमनताई पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पुरस्कृत श्री. जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनल मध्ये दुहेरी लढतीत भाजप पुरस्कृत पॅनलचे चार सदस्य आणि सरपंच पदाचे उमेदवार अविनाश बाबू सागरे यांच्यासह पाच उमेदवार निवडून आले. तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे तीन सदस्य निवडून आले. अत्यंत चुरशीसह प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत सरपंच पदाचे भाजपचे अविनाश सागरे हे राष्ट्रवादीचे लखन साठे यांच्यापेक्षा अवघ्या दोन मतांनी विजयी ठरले आहेत. सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आपली ग्रामपंचायतवर सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.
खासदार संजयकाका पाटील आणि आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल प्रमुख माजी सरपंच कृष्णा पाटील,संपत पाटील, रोहित सूर्यवंशी,सुरेश भंडारे,चेअरमन संपत पाटील, सुभाष पाटील,ज्ञानदेव पाटील, यांच्यासह विजयी उमेदवारांनी गावात जल्लोष साजरा केला.