प्रतिष्ठा न्यूज

पत्रकार वारिशे यांच्या मारेकऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई व्हावी : सांगली जिल्हा पत्रकार संघाची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मारेकऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आज मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या सांगली जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
दरम्यान जोपर्यंत वारिशे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.असा इशारा सांगली जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिला.
यावेळी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, सांगली जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी,सचिव प्रवीण शिंदे, परिषद प्रतिनिधी जालिंदर हूलवान, जेष्ठ पत्रकार रमेश सरडे, विलास सावंत, चंद्रकांत क्षीरसागर, डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव, जिल्हाकार्याध्यक्ष अभिजित शिंदे, शहराध्यक्ष सुधाकर पाटील,शहर उपाध्यक्ष ज्योती मोरे, मयुरी नाईक, बाळासाहेब मलमे,विजय हूपरीकर आदी पत्रकार बंधू उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.