कृष्णा कालव्यातून सिंचन सुरु करून वसगडे बंधारा भरून शेतकऱ्यांची अडचण सोडवावी : आमदार सुमन ताई पाटील
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कृष्णा नदीमध्ये नैसर्गिक पाण्याचा पुरेसा प्रमाणामध्ये विसर्ग होत नसल्यामुळे,कृष्णा कालव्याचा शेवटचा भाग समजला जाणारा वसगडे बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे केली होती.पण धरण क्षेत्रातील काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे तारळी धरणातून खोडशी बंधाऱ्यात पाणीपुरवठा करणे अडचणीचा झाला आहे.त्यामुळे खोडशी बंधाऱ्यात तारळी ऐवजी उरमोडी धरणातूनच पाणी सोडून खोडशी बंधाऱ्यापासून सुरू होणाऱ्या कृष्णा कालव्यातून सिंचन चालू करावे आणि वसगडे बंधारा भरून शेतकऱ्यांची अडचण सोडवावी या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील यांनी मा.शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन निवेदन देऊन विनंती केली.