खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले अवकाळीमुळे झालेल्या नुकसानचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
प्रतिष्ठा न्यूज
सांगली : आज दि १ डिसेंबर २०२३ रोजी खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई साठी तातडीने पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले.
गेल्या काही दिवसा पासून सांगली जिल्ह्यातील बहुतांशी गावामध्ये पावसाने थैमान घातले आहे. ह्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष , ऊस, कांदा, तूर, गहू , ज्वारी, व रब्बी हंगामातील उतार पिकांचे खूप मोट्ठे झाले आहे. ह्या संदर्भात खासदार संजयकाका पाटील ह्यांनी आज जिल्हा कलेक्टर ह्यांची भेट घेऊन तात्काळ नुकसान झालेल्या शेती चे पंचनामे करण्या संदर्भात पत्र दिले.