तासगाव मधील सर्व गोविंदा पथकांचा मोफत अपघात विमा नगरपालिकेने उतरवावा मनसे नेते अमोल काळे यांची मागणी
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: तासगाव मधील बऱ्याच गोविंदा पथकांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवून तासगाव चे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवले आहे,तासगावातील तरुण वर्गाचा दहीहंडी हा सण जिव्हाळ्याचा बनला आहे.कोरोना महामारीच्या भीषण कालावधीनंतर यावर्षी पुन्हा एकदा सगळे सण आनंदाने साजरे करावयाची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिली आहे.त्यामुळे जनमानसात आनंदाचे वातावरण आहे.19 ऑगस्ट 2022 रोजी दहीहंडी हा सण तासगाव मध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. महाराष्ट्रातील वसई-विरार या महानगरपालिकेने त्यांच्या हद्दीतील सर्व गोविंदा पथकांना अपघात विमा मोफत करून देण्याचा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे.आपणास ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना तासगाव तालुक्याच्या वतीने विनंती करतो की, तासगाव मधील सर्व गोविंदा पथकांचा मोफत अपघात विमा उतरवा , जेणेकरून जास्तीत-जास्त तरुण या सणात सहभागी होतील व गोविंदा पथकांच्या सुरक्षतेच्या बाबतीत तासगाव नगरपरिषदेकडून एक चांगले पाऊल उचलले जाईल असे निवेदन आज मनसे नेते अमोल काळे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहे.