तासगावात राष्ट्रीय लोकअदालतच्या माध्यमातून कौटुंबिक वादातून तुटलेली मनं पुन्हा जुळली
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : संवादातून मनं जोडली जातात आणि वादानं तुटतात,अशाच कौटुंबिक वादातून तुटलेल्या मनांना जोडण्याचं काम आज दिवाणी न्यायालय,तासगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून न्यायाधीश डॉ आर.एस.कुळकर्णी व ॲड मुन्ना मन्सुर नदाफ यांचेकडून झाले.२०१९ मध्ये शरीफ आणि झाेया (नावं बदलली आहेत) यांचा विवाह झाला.लग्नाची पहिली दोन-तीन वर्ष आनंदात गेली. दोन मुलं झाली,परंतू नंतर कुटुंबातील छोटया-छोटया वादातून त्यांच्यात अंतर पडायला लागलं.हे प्रमाण एवढं वाढलं की,२०२३ ला घटस्फोटासाठी केस दाखल केली गेली.परंतू मतभेद संपून सुखाने संसार सुरु व्हावा यासाठी ॲड नदाफ यांनी कुंटुंबियां समवेत कोर्टासोबत समुपदेशन घडवून आणले व अखेर २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत मध्ये पॅनेल अध्यक्ष न्यायाधीश डॉ आर.एस.कुळकर्णी सााे व पॅनेल मेंबर ॲड एस.एस.कणसे यांचे हस्ते एकमेकांना पुष्पगुच्छ देत त्यांनी संसाराच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.