प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तहसीलच्या कारभारावर कुणाचाच अंकुश नसल्याची स्तिथी.. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:साहेब नाहीत,टेबलला ठेवले आहे,सहीला दिल आहे,सही झाली नाही,उद्या या,मिटिंग आहे, वेळ मिळाला नाही अशी उत्तर देऊन आठ आठ दिवस फक्त साहेबांच्या सही साठी सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे घालायला लावणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कुणाचाच अंकुश नसल्याचे चित्र सध्या तासगाव तहसील कार्यालयात पहायला मिळत आहे.त्यामुळे वैतागलेले नागरिक थेट जिल्हाधिकाऱ्यां कडे तक्रार करणार असल्याचे खाजगीत बोलत आहेत.तसेच कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांसह कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मिटिंगच्या नावाखाली संपूर्ण कार्यालयच ओस पडल्याचे चित्र पहायला मिळते.तहसील कार्यालयातील कारभार मागील काही दिवसांपासून ढेपाळला आहे.बहुतांश अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेचे नियम पाळत नसून ‘कार्यालयात उशिरा येणे व लवकर जाणे’ हा नवा पायंडा तहसील कार्यालयात लागू झाला आहे.बैठका, दौऱ्यांच्या नावाखालीही अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहत आहेत.यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबत असून,या कारभारावर कुणाचाही अंकुश उरला नाही. तहसील कार्यालय नावापुरतेच चालू असल्याचे दिसत आहे.हा प्रकार तहसील कार्यालयात नित्याचाच झाला असून,अपुरे कर्मचारी आणि त्यात अप-डाऊन,दांडी बहाद्दरांमुळे कारभार ढेपाळला असल्याचें दिसत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.