शिवसेनेला (उबाठा) जागा मिळाल्यास आघाडी धर्म पाळा : चंदन चव्हाण; कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांचे वक्तव्य निराशाजनक
प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : सांगली मतदारसंघाबाबत लोकसभा अद्याप महविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही. ही जाग कोणाला मिळणार हे स्पष्ट नाही. शिवसेनेने (उबाठा) कोल्हापूरची जागा कॉग्रेसला सोडली आहे. त्या बदल्यात सांगली मागितली आहे. सांगली शिवसेनेला मिळाल्यास आघाडीतील घटक पक्षांनी आघाडी धर्म पाळावा, आवाहन शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी केली आहे. कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांची एकतर्फी भुमिका, वक्तव्य निराशाजनक असल्याची टिकाही चव्हाण यांनी केली.
चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीच्याच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर कोल्हापूर लोकसभेचा निर्णय घेऊन काँग्रेसला जागा सोडली. मात्र सांगली लोकसभेची जागा देताना शिवसेनेचा क्लेम असताना सुद्धा अजून अंतिम निर्णय झाला नाही. आमच्या पक्षाचे आम्हाला आदेश आहेत जी जागा मिळेल त्यासाठी शेवटपर्यंत एकोप्याने काम करावे असे असताना आमदार विक्रमसिंह सावंत हे आघाडीला नुकसान पोहोचवत असल्याचे त्यांच्या जाहीर वक्तव्यामुळे दिसत आहे. शिवसेनेसह या जिल्ह्यातील मित्रपक्ष राजकीय वक्तव्य टाळता असताना कॉग्रेसची ही भूमिका महाविकास आघाडीस हानिकारक असल्याने त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे.