प्रतिष्ठा न्यूज

लिलाव प्रकरणी तासगाव गणपती पंचायतनवर कारवाईची मागणी बिनबुडाची… सर्व संबधीतावर कायदेशीर कारवाई करणार : विश्वस्त राजेंद्र पटवर्धन…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : लिलाव आम्ही काढणे हे सर्व खोडसाळांचे काल्पनिक खेळ आहेत आम्ही कोणतेही लिलाव इत्यादीचे जाहीर प्रकटन कधीही कोठे दिलेले नसून,लिलाव प्रकरणी तासगाव पंचायतन वर कारवाईची मागणी हे बिन बुडाची व खोटारडेपणाचा कळस असणारी मागणी ज्या खोडसाळ व समाज घातकी इस्मानी केले असेल त्यावर सर्व संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई आम्ही करणार असल्याचे श्री गणपती पंचायतन देवस्थानचें विश्वस्त डॉक्टर राजेंद्र पटवर्धन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की आमचा ट्रस्ट बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट कायद्यानुसार नोंदलेला असून त्याचा नोंदणी क्रमांक 883 ए सांगली असा आहे.तसेच आमच्या ट्रस्टच्या सर्व जमिनी मे.धर्मादाय आयुक्त यांच्याकडे रीतसर नोंदलेल्या असून,आम्ही कोनतेही लिलाव ई.चें जाहीर प्रकटन कधीही कोठेही दिलेले नाही असे पंचायतनचें विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी सांगितले आहे. याबाबत माहिती अशी कि दोन दिवसापूर्वी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तासगाव गणपती पंचायतन ट्रस्टीनी,जिल्ह्यातील त्यांच्या जमिनीचा 99 वर्षाच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार असून ट्रस्टिंची जमीन लिलाव प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. त्यामुळे अशी कोणतीही लिलाव प्रक्रिया होणार नसल्या बाबतचा पंचायतनचें विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी खुलासा केला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.