शिक्षकांच्या बदल्यातच गोलमाल झाल्याचा संशय – संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांचा आरोप
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिक्षक बदली जिल्हा परिषद सांगली, शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा अंतर्गत बदली प्रकिया पूर्ण झाली ,पण अधिकारांचा वापर करून बदली करण्यात आली.काही शिक्षक यांना हेतुपुरस्सर खाली बसायला सांगूनच, महिला शिक्षक यांना अधिक संधी दिली गेली असे एकंदरीत बदली झालेल्या शिक्षक यांचेत चर्चा ऐकावयास मिळत आहेत. ऑनलाइन दिसायलाच, अर्थिक व्यवहार पण शिक्षक संघटना नेते मंडळी यांचे माध्यमातून झालेला आहे.पुरुष एकल शिक्षक यांचे वर अन्याय झालेचे दिसत. आहे,मागील सप्टेंबर पटावर बदली प्रकिया राबवली, पण चालू शैक्षणिक वष॔ मध्ये येणारा दाखल पट किती याचा विचार करणे आवश्यक होते, संभाव्य धोके,समस्या याचा विचार करून निर्णय घेण्यात येणे आवश्यक होते,अधिकारी यांनी दूरदृष्टीतून विचार करून पुढील शैक्षणिक कार्यास, त्या शाळेतील, शिक्षक पट कमी झालेने बदली करून जावू शकतो.एका गावात दाखल बालके 30 असतील,आणि परिसरात शाळा चार किंवा पाच असतील तर जिप शाळेत किती बालके दाखल होतील, तर 10 ते 15 मग कशी शाळा टिकेल.शासनाच धोरणच मागेल त्याला शाळामंजुरी देवून मागील वीस एक वष॔ पासून शिक्षण विभागात गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे. अंतराचा नियम धाब्यावर बसवून शाळांना मंजुरी राज्य शासनाने दिल्याने, वस्ती शाळा, शासनानेच बंद करणेस सुरवात केलेली आहे. यापूर्वी संभाजी ब्रिगेडने निवेदन देऊन शाळा बंद धोरणाला विरोध केला आहे.तरी बदली प्रकिया परिणामकारक पणे झाली आहे.हा एक बागुलबुवा च आहे. अन्याय झालेल्या शिक्षकांनी संपर्क साधावा. याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केली आहे.