प्रतिष्ठा न्यूज

हिंदूंनी फाळणीच्या वेळेचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावे : अधिवक्ता सतीश देशपांडे

प्रतिष्ठा न्यूज  
सांगली  प्रतिनिधी : भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू आणि शीख बांधवांना मारण्यात आले
हिंदू आणि शीख महिलामुलींवर भयंकर अत्याचार करण्यात आलेजे शब्दांत वर्णन करू शकत नाहीस्वत:ला बुद्धिवादी आणि इतिहासतज्ञ समजणारे दोन्ही बाजूने हिंसाचार झालाअसे आतापर्यंत खोटे सांगत आले आहेतहा हिंदू मृतकांवरील अन्याय असून इतिहासातील चूकसुद्धा आहेहिंदूंनी फाळणीच्या वेळेचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावेअसे आवाहन इतिहास व संस्कृती अभ्यासक आणि लेखक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केलेहिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

 अधिवक्ता देशपांडे पुढे म्हणाले कीमुस्लिम लीगच्या ‘डायरेक्ट एक्शन डे’च्या घोषणेने दंगली घडवूनहिंदूंवर अत्याचार करुन आणि भूमी बळकावून फाळणी घडवून आणली गेलीपश्चिम बंगाल प्रांत आणि तेव्हाचा पूर्व बंगाल (आताचा बांगलादेशयेथे श्रीगोपाल पाठा यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी केलेल्या प्रतिकारामुळे मुस्लिम लीगने त्यावेळी केलेल्या दंगली रोखल्या गेल्यामात्र श्रीगोपाल पाठा कोण आहेतहे आजच्या पिढीला माहितीच नाहीकारण भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू बांधवांवर झालेला अत्याचार आणि बलिदानाचा सत्य इतिहास आतापर्यंत सांगितलाच गेलेला नाहीआताच्या पाकिस्तानात असलेले लाहोररावळपिंडी या ठिकाणी हिंदूंच्या नृशंस हत्यास्त्रियांवर अमानुष अत्याचार झालेरेल्वेगाड्यांमधून हिंदूंचे मृतदेह ‘आझादी का तोहफा’ म्हणून अमृतसर आणि देशातील अन्य ठिकाणी पाठवण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाचे विभाजन होईलयाविषयी वर्ष 1942 मध्ये आपल्या भाषणातून अगोदरच सावधही केले होतेमात्र सावरकरच देशाच्या फाळणीला जबाबदार आहेतअसा दुष्प्रचार अजूनही केला जातोमोहम्मद अली जीना यांच्यासह मुसलमान नेत्यांनी फाळणी घडवून आणलीहे सत्य सुस्पष्टपणे सांगितले जात नाहीतअसेही अधिवक्ता देशपांडे म्हणाले

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.