प्रतिष्ठा न्यूज

प्रदूषणाच्या नावाखाली गणेशोत्सवच नव्हे, तर अनेक सण-उत्सवांवर बंधने आणण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्ता सतीश देशपांडे

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : कत्तलखाने आणि कारखाने यांमुळे प्रदूषण होतेहे गोदावरीयमुना आदी अनेक नद्यांविषयी सरकारनेच दिलेल्या अहवालांतून स्पष्ट झाले आहेमात्र गणेशोत्सवामुळे प्रदूषण होतेयाची अधिकृत माहितीआकडेवारी सुद्धा कोणाकडे नाहीमग गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होतेहे कोणत्या आधारावर म्हटले जात आहे गणेशोत्सवच नव्हेतर हिंदूंच्या सर्व सणउत्सवांवर विविध बंधने आणायचे षड्यंत्र आहेगणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाहीहे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजेहिंदूंनी याविषयी आवाज उठवला पाहिजे आणि जागृती केली पाहिजेअसे आवाहन इतिहास आणि संस्कृती अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण होते का?’ या विषयावरील विशेष संवादात ते बोलत होेते.

या वेळी कोल्हापूर येथील ‘हिंदू एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष श्रीदीपक देसाई म्हणाले की, वहात्या पाण्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन केले पाहिजे अशी हिंदू धर्मात परंपरा आहेमात्र आज वाहत्या पाण्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास पोलीसप्रशासनाकड़ून विरोध केला जातो आणि हे कुठल्या आधारे केले जातेतसेच न्यायालयाच्या कोणत्या आदेशानुसार केले जातेयाविषयी पोलीसप्रशासनाकडे नीट उत्तर नाहीकोल्हापूर येथील पंचगंगा नदीमध्ये ते नाल्यांचे आणि कारखान्यांचे पाणी सोडलेयाकडे प्रशासनाचे लक्ष नाहीमात्र गणेशोत्सव आला कीहे प्रदूषणाच्या नावाखाली जागे होतातहिंदूंच्या प्रथापरंपरा बंद करण्यासाठी हे सर्व केले जात आहेअसे यातून दिसते.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता श्रीसतीश कोचरेकर म्हणाले कीगणेशोत्सवात प्रदूषण होतेअसा भ्रम नागरिकांमध्ये तथाकथित पर्यावरणवादीविज्ञानवादीअंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले निर्माण करत आहेतमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्च 2023 मध्ये जाहीर केलेल्या पुस्तिकेत सर्वांत हानीकारक प्रदूषित नद्यांमध्ये मुंबईतील मिठी नदीनागपूरमधील कन्हान नदीपुण्यातील मुळामुठा नद्या यांचा उल्लेख केला होतामार्चमध्ये तर गणेशोत्सव नव्हतातर मग हे कोणते प्रदूषण होते कारखानेकत्तलखाने यांच्यामुळे वर्षभर होणारे प्रदूषण त्याविषयी आवाज न उठवणारे विज्ञानवादीसेलिब्रिटी मात्र गणेशोत्सवात प्रदूषण होतेयाविषयी बोलतांना दिसतातकारखाने आणि कत्तलखाने यांच्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी यांनी काही केले आहे का गेली 10-12 वर्ष कृत्रिम तलाव बनवल्यावर प्रदूषण कमी झाले आहेअसे सरकार आकडेवारीसह जाहीर करेल का हिंदूंचा गणेशोत्सव आणि अन्य सण प्रदूषण निर्माण करत नाहीतउलट जीवनात ज्ञान आणि आनंद यांची वृद्धी करतातगणेशोत्सव आणि हिंदूंच्या सणउत्सवांत प्रदूषण होतेया भ्रमातून हिंदूंनी बाहेर येऊन आपले सणउत्सव साजरे करावेतअसेही श्रीकोचरेकर यांनी शेवटी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.