विजापूर गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी आंदोलन उभा करण्याचा शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय
प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : विजापूर गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी आंदोलन उभा करण्याचा निर्णय बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेने ही बैठक तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे बोलावली होती.
विजापूर गुहागर महामार्गात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला आणी दिलासा रक्कम व्याजासह मिळाली पाहीजे या मागणी साठी आंदोलन उभा करण्याचा निर्णय बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रभाकर तोडकर हे होते. यावेळी किसान सभेचे राज्य अध्यक्ष काॅम्रेड उमेश देशमुख नागरी जागृती मंच चे अध्यक्ष सतिश साखळकर उपस्थित होते.
विजापूर गुहागर महामार्ग दोन भागात विभागला गेला आहे. एक विटा मार्गे तर दुसरा भाग तासगाव मार्गे जात आहे. दोन्ही ठिकाणी साठ-साठ फुटाचा महामार्ग आहे. मुळचा हा रस्ता १६ फुटाचा असलातरी नकाशावर फक्त आठ फुट रस्ता दाखवला आहे. त्यामुळे उर्वरित जमिन अधिग्रहण केली आहे. पण प्रशासनाने शेतकऱ्यांना आंधारात ठेवुन, शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांचे त्यांच्या हक्काचे पैसे दिले नाहीत. ते मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा पहीला टप्पा दि. ११ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी श्री. दिघे साहेब यांना निवेदन देवुन आंदोलनाची सुरवात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी नारायण चौगुले, सुनील पवार, लक्ष्मण म्हेत्रे, सुरेश एकुंडे, माणिक जमदाडे, राजु पठाण, गणीभाई पठाण, यांच्यासह भागातील शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.