प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शहरातील बायपास रिंगरोडचा प्रश्न मार्गी…पुढील एक महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होईल : माजी खासदार संजयकाका पाटील..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव शहरालगत असणाऱ्या भिलवडी नाका ते विटा रोड या रिंगरोडबाबत आज तासगाव येथील समृद्धी मल्टीपर्पज हॉल येथे बैठक पार पडली.माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार रविंद्र रांजणे,भुमि अभिलेखचे उपअधिक्षक कांबळे, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता आकाश हुद्दार आणि संबंधित शेतकरी यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले.ते म्हणाले,तासगाव शहरालगत असणारा भिलवडी नाका ते विटा रोड हा बायपास रिंगरोड बऱ्याच दिवसांपासून प्रलंबीत होता. हा रिंगरोड करण्यासाठी मोजणी, आरेखण,भुसंपादन आदी सर्व प्रक्रिया पुढील एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल.सदर रस्त्याकरीता शासनाकडून सुमारे रक्कम रु.८५ कोटीचा निधी मंजूर असून तो शासनाकडून उपलब्धही करुन देण्यात आला आहे.त्याचसोबत विटा रोड ते पुणदी रोड या बायपास रिंगरोडचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येणार असलेचेही माजी खासदार संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले.प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सदर रस्त्यासंदर्भातील सर्व शासकीय नियम,अटी व तांत्रीक बाबी शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या. तसेच लवकरात लवकर जाहीर नोटीस,भुसंपादन व मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, हेही स्पष्ट केले.भिलवडी नाका ते विटा रोड या रिंगरोडचे काम मार्गी लागणार असल्याने तासगाव शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.यामुळे शेतकरी व नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.