प्रतिष्ठा न्यूज

शाळा बंद धोरणाला संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्यात सध्या 20 पेक्षा कमी पठ असलेल्या शाळा बंद करण्याबाबत धोरण आखले जात आहे. शासनाच्या या धोरणाने सामान्य, बहुजन, गरीब वंचित घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहणार आहे. त्यांचे शिक्षण वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आज उप जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील 385 वाड्या वस्तीवर शाळा कमी पटसंख्या नावाखाली बंद करण्यात येणार आहेत. या शाळेतील विद्यार्थी आपोआपच शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकला जाणार आहे .शाळेच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या या विद्यार्थ्यांचे शिक्षण अंधकारमय होणार आहे. समाजातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, राजकीय संघटना यांनी एकत्र येऊन या धोरणाला विरोध करण्याची गरज आहे. एकदा बंद झालेली शाळा व बंद झालेले मुलांचे शिक्षण पुन्हा सुरू होणार नाही. मुलांचे हक्काचे, मोफत व सक्तीचे शिक्षण मिळालेच पाहिजे या हेतूने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. याची शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर आंदोलन उभा करेल असा इशारा महानगराध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिला. यावेळी पूर्व अध्यक्ष राजू पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष रेखा पाटील, संघटक जितेंद्र भोसले, विभाग प्रमुख नितीन पवार, शहर उपाध्यक्ष महेश भंडारे, शहर महिला अध्यक्ष भारती पाटील, शिक्षक आघाडी अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष मराठा सेवा संघ नितीन चव्हाण उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.