तासगाव गुरुवार पेठ ते सांगली नाका नवीन बायपास रोडची दुरावस्था
आठ दिवसात रस्ता होईल मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांचे आश्वासन
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील गुरुवार पेठ ते सांगली नाका बायपास रोड पूर्ण पने खराब झाला असून तो लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा यासाठी आज स्थानिक युवकांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.त्यात त्यांनी म्हंटले आहे पावसाळ्यात पालिकेने खराब झालेल्या तसेच पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम घातला होता परंतु आता त्यात माती झाली असून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे,त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे.तरी नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती अक्षय गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी रोहित शिंदे, सुमित पाटील, सिद्धेश्वर शेडबाळे उपस्थित होते.