प्रतिष्ठा न्यूज

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘हिंदूंना कायदा, मुसलमानांना फायदा’ : संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ !

प्रतिष्ठा न्यूज  
सांगली  प्रतिनिधी : वर्षाच्या 365 दिवस पाचवेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकतर्फी कारवाई करत आहे. तसेच हिंदूंच्या सणांना बदनाम करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे. हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात असून याद्वारे ‘हिंदूंना कायदा आणि मुसलमानांना फायदा’ अशीच आजची स्थिती आहे. हिंदू हे कदापि सहन करणार नाहीत. मंडळ काय केवळ हिंदूंसाठीच आहे का ? मंडळाची 365 दिवस वाजणार्‍या भोंग्यांबाबत काय भूमिका आहे ? हे मंडळाने स्पष्ट करावे, अशी मागणी या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी केली. ते समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलना’त बोलत होते. हे आंदोलन मारुति चौक, गावभाग, सांगली या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले. या आंदोलनात ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित सर्व अधिकार्‍यांना निलंबित करा, अशी मागणीही करण्यात आली.

या प्रसंगी हिंदू विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या प्रीती पाटील यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी देशभरात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे (NIA) देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी,  अशी मागणीही करण्यात आली. या प्रसंगी या वेळी भाजप सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. आेंकार शुक्ल म्हणाले, ‘‘प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदू धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. यापुढील काळात हिंदू समाज हे सहन करणार नाही.’’ या प्रसंगी भाजप प्रदेश सचिव श्री. पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘सध्या परिस्थिती अत्यंत कठीण  आहे. नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी पाकिस्तानच्या युवकाला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली. त्यामुळे हिंदूंना आता हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यक आहे.’’

या वेळी समर्थभक्त श्री. शेखर कोडोलीकर म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या काळात हिंदू संघटित झाले आणि स्वराज्यासाठी लढा दिला त्या पद्धतीने आज होताना दिसत नाही; कारण हिंदू मनातील धर्मविचार आणि धर्मासाठीचा मनातील ओलावा अल्प झाल्यानेच हे होत आहे. आज आपण संघटित नाही म्हणूनच हिंदूंच्या हत्या होत आहेत. आपण धर्मप्रेम वाढवून संघटित झाल्यास हिंदूंच्या हत्या आपण निश्‍चितच थांबवू शकतो .’’

भाजपचे श्री. उदय मुळे, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. अविनाश मोहिते, श्री. बाळासाहेब पाटील, श्री. अजितकुमार काळे, सौ. माधुरी वसगडेकर, श्री. सुनील गोपाळ राजपूत यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी जागृती करणारे हस्तफलक धरले होते, तसेच विविध घोषणा देण्यात आल्या. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे श्री. संतोष देसाई  यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.