मराठा समाजाच्या आरक्षनाचा प्रश्न मार्गी लावा : तासगावच्या युवकांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आतापर्यंत अनेक सरकारं आली आणि गेली, परंतु मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न आणि समाजातील युवकांच्या समस्या कोणीही सोडवल्या नाहीत.तसेच मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षणाच्या फक्त भूलथापा देण्यात येत आहेत, मराठा समाजाच्या इतर समस्याही खूप वेदनादायी आहेत तरी त्या सोडवाव्यात. अशी विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना शहरातील युवकांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी शिवश्री अमोल कदम,शरद शेळके,पांडुरंग जाधव प्रदीप थोरबोले,दीपक पाटील,सुधीर नलवडे,विजय पाटील,राहुल जाधव, विघ्नेश जाधव, अवधूत धाबुगडे, खंडू कदम, लहू लुगडे, राम जमदाडे उपस्थित होते.