सावळज येथील अग्रणी नदी पात्रात जलपर्णीचा विळखा : दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने प्रदूषण नियंत्रणने लक्ष घालण्याची मागणी
प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज ता.२७ : पावसाचा जोर ओसरल्यामुळे अग्रणी नदीपात्रातील वाहते पाणी कमी होत असल्यामुळे नदीपात्रास गटारीचे स्वरूप आले आहे. त्यातच गेल्या दोन तीन वर्षांपासून नदीपात्रात जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. नदीतील वाहते पाणी बंद झाल्याने दुर्गंधीयुक्त जलपर्णीमुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबत प्रदूषण नियंत्रण विभागाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तरीही याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.