नराधम ‘लव्ह जिहादीं’ना फासावर लटकवा ! – तासगाव येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी
प्रतिष्ठा न्यूज
तासगाव (जिल्हा सांगली) : – महाराष्ट्रातील मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक-दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी 19 डिसेंबर या दिवशी दुपारी 4.30 वाजता बागणे चौक, तासगाव येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि रणरागिणी शाखेच्या सौ. विद्या सादुल यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. या आंदोलनासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सिद्धेश्वर लांब आणि श्री. आकाश पाटील, भाजपचे श्री. संदीप सावंत, राष्ट्रसेविका समितीच्या श्रीमती अनुराधा मोडक, भाजपचे कार्यकर्ते श्री. प्रताप माळी यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.आंदोलन झाल्यावर भाजपचे माजी नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विषय जाणून घेतला आणि निवेदनावर स्वाक्षरी केली.
या वेळी ‘हर हर महादेव’ ‘चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणा देण्यात आल्या.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई म्हणाले, ‘‘हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का? त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा. राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण पहाता, बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही गृहखात्याने चौकशी करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.’’