भारत जोडो यात्रेच्या समारोपानिमित्त काँग्रेस भावनात झेंडावंदन
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी दि. ३० : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपानिमित्त काँग्रेस भवनात सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, विशाल पाटील, उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने, सिकंदर जमादार, मनिषा रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशातील द्वेषाचं वातावरण संपूर्णता नष्ट व्हावे हा संदेश देत हिंसा आणि द्वेषमुक्त समाजनिर्मितीसाठी पोषक वातावरण निर्मिती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये आज भारत जोडो यात्रेची सांगता झाली असली, तरी राहुलजींनी या वातावरणात निर्माण केलेली सकारात्मकता कधीच नष्ट होणार नाही.
यावेळी विशाल पाटील म्हणाले, महात्माजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जपलेली तत्त्वे ही वैश्विक होती. सामान्य जनता सुखी राहावी, प्रत्येक भारतीय अभिमानाने जगावा यासाठी ते अविरत कष्ट करीत राहिले. त्या कष्टाचे पाईक होण्याची ताकद अंगी येऊ दे.
या कार्यक्रमप्रसंगी मालनताई मोहिते, नगरसेवक, संतोष पाटील, रविंद्र वळवडे, अमित पारेकर, अॅड. भाऊसाहेब पवार, वसीम रोहिले, पैगंबर शेख, विक्रम कांबळे, अजित ढोले, बाबगोंडा पाटील, अशोक मालवणकर, महावीर पाटील, नामदेव पठाडे, सचिन चव्हाण, आप्पा पाटणकर, राजेंद्र कांबळे, आयुब निशानदार, भिमराव चौगुले, प्रकाश माने, उत्तम सुर्यवंशी, सुरेश गायकवाड, अरूण धोतरे, विश्वास यादव, शिवाजी पाटील, कांचन खंदारे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, रामचंद्र पवार, नंदाताई कोलप, श्रीधर बारटक्के, सीमा कुलकर्णी, आरिफ मालगावे, वैषाली गद्रे, कोळी मामा, सुचेरा कुलकर्णी, जुबेदा बिजली काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.