प्रतिष्ठा न्यूज

सोशल मीडिया आपल्या जगण्याची पद्धत बदलत आहे : प्रा. सुरेश पाटील

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : सोशल मीडिया आपल्या जगण्याची पद्धत बदलत आहे, इथे प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. सोशल मीडिया आपल्यासाठी नक्कीच एक वरदान आहे आणि यामध्ये जगाला बदलण्याची शक्ती आहे. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे. त्यांचे खूप फायदे आहेत पण त्याचे काही नुकसान देखील आहेत. सोशल मीडियाचे फायदे व नुकसान पाहून आपण नक्कीच ठरऊ शकतो की हा सोशल मीडिया आपल्यासाठी शाप आहे की वरदान.” पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय , गगनबावडा येथे सोशल मीडिया उच्च शिक्षणातील ज्ञान भांडार या विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. वैभववाडीचे रावराणे महाविद्यालय, इतिहास विभाग प्रमुख, एस. एन. पाटील यांनी सोशल मीडिया संकल्पनेची उत्पत्ती, प्रकार आणि इतिहास तसेच, सद्यस्थिती इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सचिव व प्र-प्राचार्या डॉ. विद्या देसाई होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई व प्रमुख उपस्थिती म्हणून नॅक समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. पानारी होते. होते. कार्यशाळा एकुण तीन सत्रामध्ये संपन्न झाली.
चौगले महाविद्यालय, कोतोलीचे प्रा. डी. एच. नाईक यांनी सोशल मीडियाचा उच्च शिक्षणातील वापर या विषयावर मार्गदर्शन केले.
उपस्थित विद्यार्थ्यांची मनोगत व प्रमाणपत्र वितरण केल्यानंतर कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
प्रास्ताविक व आयोजन प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. व्ही. एस. पाटील यांनी तर, आभार प्रा. एच. एस. फरास यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.