माझी वसुंधरा अभियानात सांगली जिल्हा परिषदेचा झेंडा ; पर्यावरण दिनी मुंबईत होणार सन्मान , घाटनांद्रे ग्रामपंचायतीची राज्य स्तरावर निवड
प्रतिष्ठा न्यूज
कवठेमहांकाळ ( प्रतिनिधी) : सांगली जिल्हा परिषदेने केलेले शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी केल्याने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान संचालनाल यांच्यावतीने उद्या पर्यावरण दिनी सन्मान बोणार आहे.
तसेच घाटनांद्रे ( ता.कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची दखल घेऊन ग्रामपंचायतीचा ५ जून पर्यावरण दिनी मुंबईत सन्मान होणार आहे, तसेच आता घाटनांद्रे गावची माझी वसुंधरा स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे.
माझी वसुंधरा अभियानाच्या तिसऱ्या पर्वा अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे अंतर्गत २.५ हजार ते ५ हजार लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये घाटनांद्रे ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
“माझी वसुंधरा अभियान ३.० सन्मान सोहळ्यात” गावाचा सन्मान करण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी गावाने केलेल्या या कामगिरी बाबत हा सन्मान केला जाणार असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गावाची निवड करण्यात आली आहे. “माझी वसुंधरा अभियान ३.० सन्मान सोहळा ” सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली, मा. उप मुख्यमंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थितीत, मा. मंत्री, महसूल, मा. मंत्री, ग्राम विकास, मा. मंत्री, शालेय शिक्षण मराठी भाषा तथा पालकमंत्री मुंबई शहर जिल्हा, मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधान सभा, मा. लोकसभा सदस्य मुंबई दक्षिण मतदार संघ व मा. मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत जमशेद भाभा थिएटर, एन.सी.पी.ए., नरीमन पाईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.