प्रतिष्ठा न्यूज

तासगावकरांवर पाणी कपातीचे संकट… पाणी जपून वापरण्याचे प्रशासक पृथ्वीराज पाटील यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : यंदा पावसाळा लांबल्यामुळे ऐन पावसाळ्यात तासगाव शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय तासगाव पालिकां प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.कोयना धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे कृष्णा नदीपात्रात पाण्याची पातळी घटली आहे.शहराला ज्या भिलवडी जॅकवेल मधून पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातोय तिथंली पाणीपातळी येत्या दोन तीन दिवसात घटण्याची शक्यता असल्यामुळे रोजच्या होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करून,एक दिवस आड पाणी द्यावे लागणार असून याबाबत शहर वासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.नागरिकांनी पाणी बचत करावी,पाण्याचा अपव्यय टाळावा, पाण्याची नासाडी करू नये,असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे,तसेच पाण्याचा दुरुपयोग कोणी करू नये तसे करतांना कोनी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराहि यावेळी देण्यात आला आहे.एक सुजाण नागरिक म्हणून तासगाव शहर वासियांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.