प्रतिष्ठा न्यूज

निमणीच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसावर खोटा गुन्हा दाखल काँग्रेसचें डॉ.विवेक गुरव

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश असा उपक्रम राबवण्याचे आदेश संबंध भारतामध्ये दिले आहेत. सदर उपक्रमानुसार प्रत्येक गावामध्ये स्वातंत्र्यसैनिक व शहीद जवान यांच्या नावाचे शिलालेख उभा करणे असे आहे.परंतु तासगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये शिलालेखांवर स्वातंत्र्यसैनिक किंवा वीर जवान यांची नावे लिहिली गेली नाहीत त्यासाठी निमणी गावचे स्वातंत्र्यसैनिकांचे वारस दादासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना एकत्र करून गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले त्याचा राग डोक्यात धरून स्वातंत्र्यसैनिकांबद्दल असलेला तिरस्कार दाखवत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने दादासाहेब पाटील हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,व खासदार संजय काका पाटील यांचा आवमान समाज माध्यमांवर करता अशी खोटी फिर्याद देऊन सत्तेच्या जीवावरती त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप काँग्रेसचें डॉ. विवेक गुरव यांनी केला आहे. यावेळी त्यांनी या घटनेचा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाकडून निषेध करतो तसेच सदर बाब राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेटीवार, आमदार विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्या कानावर घातली आहे, तेही या प्रकरणांमध्ये लक्ष घालून दादासाहेब पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहो असे आश्वासन दिले असल्याचे गुरव यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.