प्रतिष्ठा न्यूज

समस्त हिंदु मातंग समाज, सांगली जिल्हा आयोजित निषेध मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वालचंद कॉलेज सांगली येथून समस्त हिंदु मातंग समाजाच्या वतीने व श्री अभिमन्यू (नाना) भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली हिंदू मातंग समाजाचे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हिंदू मातंग समाजाचे ख्रिश्चन मिशनरी कडून अंधश्रद्धा व विविध प्रलोभने दाखवून होणारे धर्मांतरण थांबवावे व फसवून धर्मांतर करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी, बऱ्याच जणांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून कागदोपत्री हिंदू मांग राहून अनुसूचित जातीचे लाभ घेतले आहे. अशा kripto ख्रिश्चनांच्या बाबतीत कठोर कारवाई करावी, दफनभूमी व चर्च साठी जागा देत असताना त्या भागात किंवा त्या गावात, शहरात कागदोपत्री ख्रिश्चन असल्याचे दाखले घेऊन मग ठरवावे, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील नियोजित बैठकीत व्हावे व जातीच्या दाखल्यासाठी असणारी 50 वर्षाच्या पुराव्याची अट रद्द करावी या प्रमुख मागण्याचे निवेदन श्री अभिमन्यू भोसले (नाना) , प. पू.श्री दादा महाराज, प. पू.श्री धर्मदास महाराज श्री अर्जुन कांबळे, श्री सतिश बल्लाळ श्री चंद्रकांत आवळे, श्री भीमराव बेंगलोर यांचेकडून मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी मातंग समाजाचे महाराज प. पु.श्री दादा महाराज, प.पू. मौनी महाराज, प. पू. श्री धर्मदास महाराज व मोर्चासाठी बहुसंख्येने मातंग समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.मागील काही वर्षांपासून हिंदू मातंग समाजाचे ख्रिश्चन मिशनरी व पास्टर हे अंधश्रदेचा वापर करून, ख्रिश्चन संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून व धर्मांतरासाठी जिथं ज्या गोष्टींचा वापर करता येईल ते करून हिंदू मातंग समाजाचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले आहे. हे करत असताना त्यांनीं आमच्या मातंग समाजाचे श्रद्धास्थान असणारे देवी देवतांच्या मूर्तीची ही विटंबना केली व त्यांच्याबद्दल अपशब्द ही काढले आहेत. अशा तक्रारी समाजातून आल्या आहेत. तर यासर्व गोष्टींचा निषेध म्हणून व मिशनरी व पास्टर यांच्यवर गुन्हे दाखल करून त्यांच्यवर कडक कारवाई करावी. व ज्या ज्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून कागदोपत्री ख्रिश्चन न होता हिंदु मातंग दाखला दाखवून (SC) चे सर्व प्रकारचे फायदे व सवलती घेतल्या आहेत. अशा लोकांचा सर्वे करून त्यांच्यावर संविधानानुसार कडक कारवाई करावी व हिंदू मातंग समाजाचे होणारे धर्मांतरण थांबवावे. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, क्रंतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील नियोजित जागेत व्हावे. जातीच्या दाखल्यासाठी असणारी 50 वर्षा पूर्वीचा पुराव्याची अट रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी सोमवार दिनांक 11 रोजी दुपारी मा.जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली होणाऱ्या समस्त हिंदु मातंग समाजाच्या मोर्चाचे आयोजन केले प्रमुख श्री अभिमन्यू भोसले (नाना) यांच्याकडून करण्यात आले. यावेळी माजी आमदार श्री नितीन राजे शिंदे यांनी कडक शब्दात ख्रिश्चन मिशनरी कडून होणाऱ्या हिंदू देव देवतांच्या विटंबना व धर्मांतरण हे थांबवले नाही तर येणाऱ्या काळात मोठी आंदोलने उभी करू असा इशारा दिला.
यावेळी हिंदू एकता आंदोलन, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, संभाजी ब्रिगेड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोर्चास उपस्थित राहून वरील मोर्चातील मागण्यांचे समर्थन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.