प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील प्रत्येक खेडे गावात मराठा समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत आहेत. जालना या जिल्ह्यात सराटी गावामध्ये बेमुदत आमरण उपोषण करणारे सन्माननीय मनोज जरंगे_पाटील यांना समर्थन देण्यासाठी सुरू केलेले साखळी उपोषण,धरणे आंदोलने, ठिया आंदोलन, कॅन्डल मार्च, मशाल मोर्चा, बेमुदत उपोषण व ज्याला जमेल तसे वेग वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या भागात आंदोलन करीत आहेत. असेच आंदोलन सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग या गावात.माननीय प्रकाश वाळेकर हे बेमुदत आमरण उपोषणास बसले होते. ज्या ठिकाणी आमरण उपोषणास बसले होते त्या रस्त्यावरून सांगलीचे जिल्हाधिकारी मा.राजा दयानिधी यांची गाडी जात होती, परंतु नाव राजा असलेले व नावात दया असलेल्या जिल्हाधिकारी राजा दयानिधी त्यांना दया आली नाही हाकेच्या अंतरावर बेमुदत आमरण उपोषण करते प्रकाश वाळेकर यांचे निवेदन स्वीकारण्यास व भेटण्यास नकार दिला.उपोषण स्थळी त्यांना विनंती करून देखील हाकेच्या अंतरावर त्या ठिकाणी जायची तसदी घेतली नाही,उलट त्या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेल्या अवस्थेतच तेथील पदाधिकाऱ्याने प्रकाश वाळेकर यांना चौघानीआहे त्या अवस्थेत उचलून जिल्हाधिकारी यांच्यासमोर आणले गेले आणि मग त्यांनी निवेदन स्वीकारले, एकीकडे मुंबईत एका ठिकाणी कांद्याचे पोतं उचलून देण्याचा फोटो सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धीचा स्टंट करणारे राजा दयानिधी दुसरीकडे आपण ज्या जिल्ह्याचे कलेक्टर आहात त्या जिल्ह्याच्या लोकांचे मागणीचे निवेदन स्वीकारात नसेल तर तुम्हाला काय म्हणावे लागेल,आम्ही सुद्धा त्यांना सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी गेलो होतो,तरी ते आम्हाला भेटत नव्हते,मराठा आरक्षणासाठी
जालना जिल्ह्यात सराटी अंतरवाली या ठिकाणी बेमुदत उपोषणास बसलेले सन्माननीय मनोज जरंगे-पाटील यांच्या उपोषण स्थळी मंत्रिमंडळातील मंत्री व मुख्यमंत्री ही उपोषण स्थळे जाऊन त्यांची विचारपूस,चौकशी करत होते ,परंतु सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याची गाडी उपोषण स्थळाच्या जवळून जाऊन सुद्धा बेमुदत उपोषण करणारे माननीय प्रकाश वाळेकर या उपोषणकर्त्याची साधी विचारपूस, चौकशी सुद्धा केली नाही व त्यांचे जवळ जाऊन निवेदन स्वीकारण्यास ही नकार देणाऱ्या,या जिल्हाधिकाऱ्याला आपण या सांगली जिल्ह्याचे मायबाप आहोत व पालक आहोत याचा विसर पडलेला दिसत आहे.अशी विचारणा सर्व मराठा समाजातून केली जाऊ लागली आहे. उपोषणकर्त्याचे निवेदन स्वीकारत नसेल, जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर मागच्या दाराने निघून जात असेल,तर ह्या जिल्हाधिकाऱ्याला या जिल्ह्याची गरज नाही किंवा मराठा समाजा विषयी आकस आहे असं दिसत आहे. अशा बेभरवश्याच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगली जिल्ह्यात ठेवायचे कशाला असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे म्हणून थोड्याच दिवसात या जिल्हाधिकाऱ्याची सांगली जिल्हा बाहेर पालखी लवकरच काढणार अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली.